करंजाडे वसाहतीचा पाणी प्रश्न सोडवा ...खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना निवेदन ...सिडको प्रशासनास तातडीने प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश द्या
पनवेल - पनवेल जवळील करंजाड्यात दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याबाबत पुन्हा दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली असून हा प्रश्न सुटावा म्हणून मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना करंजाडे पीपल्स फाऊंडेशनतर्फे निवेदन देण्यात आले.
करंजाडे शहर हे सिडकोच्याअखत्यारीत असून अनेक सुविधांच्याअभावामुळे येथील नागरिकांना त्याचा
प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यातील महत्त्वाचा मुद्दा पाणीप्रश्नअसून मागील तीन वर्षांपासून येथे पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.मागील १८ जून २०२४ रोजी सिडको
प्रशासनाच्या विरोधात नागरिकांनी रास्तारोको आंदोलन पुकारले होते, त्याप्रसंगी मोर्चामध्ये सिडको अधिकारी उपस्थित राहून नागरिकांच्या मागण्यांवर लेखी आश्वासन दिले होते.त्यानंतर सहा महिने सुरळीत पाणीपुरवठा केला जात होता.परंतु मागील दोन महिन्यांपासून पुन्हा
दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे रहिवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.करंजाडे शहरातील
सेक्टर-६ मधील रहिवाशांना एक आठवड्यानंतर पाणीपुरवठा केला जातो,परिणामी प्रायव्हेट टँकरवर
सोसायट्यांचा अतोनात खर्च होत आहे.मागील जन आंदोलनात सिडको प्रशासनाने मान्य केलेल्या गाण्यांपैकी एकही मागणीची पूर्तता होतांना दिसत नाही.करंजाडे पाणीप्रश्नावर खासदार या नात्याने आपण प्रकर्षाने लक्ष घालून सिडको प्रशासनास तातडीने प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश द्यावेत,अशी विनंती करंजाडे पीपल्स फाऊंडेशनतर्फे करण्यात आली आहे.
Post a Comment