News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

सिडकोने पाणी पुरवठा सुरळीत केला नाही तर करंजाडेवासीयांचा १८ जून रोजी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा

सिडकोने पाणी पुरवठा सुरळीत केला नाही तर करंजाडेवासीयांचा १८ जून रोजी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा

पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः करंजाडे वसाहतीला गेल्या काही वर्षांपासून पाणीटंचाईचे ग्रहण लागलेले आहे. पाण्यावाचून नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. सिडकोने पाणी पुरवठा सुरळीत केला नाही तर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा करंजाडे वासीयांनी दिला होता.10 जूनपर्यंत सिडकोने पाण्याबाबत काहीही हालचाल केली नाही.त्यामुळे 18 जून रोजी करंजाडे वसाहतीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या जेएनपीटी रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते विनोद साबळे यांनी दिली.
करंजाडे वसाहत सिडकोने वसवली आहे.मात्र मूलभूत सुविधा पुरवण्यात सिडको अपयशी ठरलेली दिसून येत आहे. पुरेसे पाणी मिळत नसल्याने येथील रहिवासी हैराण झाले आहेत.पाण्याअभावी नागरिकांचे हाल सुरू आहेत. या संदर्भात गेल्या काही दिवसांपूर्वी विनोद साबळे यांच्या अध्यक्षतेखाली करंजडे वासी यांनी सभा आयोजित केली होती. यावेळी 10 जून पर्यंत सिडकोला पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत अल्टिमेटम देण्यात आला.मात्र दहा तारीख उजाडून गेली तरीदेखील सिडकोने येथील पाणीपुरवठा सुरळीत केलेला नाही. पाणी नसल्याने कामे उरकायची कशी असा सवाल या निमित्ताने विचारला जात आहे.रविवार 9 जून रोजी करंजाडे वसाहतीतील नागरिकांची बैठक पार पडली. यावेळी 18 जून रोजी जेएनपीटी रोड येथे रस्ता रोको आंदोलन करण्याचे ठरवण्यात आले.जोपर्यंत पाणी प्रश्‍न सुटत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवणार असल्याचे विनोद साबळे यांनी सांगितले. करंजाडे वसाहतीतील नागरिकांनी सिडकोला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी दहा तारखेपर्यंत वेळ दिली होती. मात्र पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने रास्ता रोको आंदोलन 18 जूनला करण्यात येणार आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने सर्व करंजाडे एकत्रित येण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले आहेत.

रोजच्या गरजेच्या ज्या गोष्टी आहेत त्या पाण्यामुळे करता येत नाहीत त्यामुळे आम्ही आता रस्त्यावर उतरणार आहोत. जास्त ताकतीने महिला या मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. आम्हाला पाणी विकत आणावे लागत आहे. रस्त्यावर उतरून रास्ता रोको करून सिडकोला जाब विचारणार असल्याचा इशारा महिलांनी दिला. पाणीटंचाईमुळे करंजाडेकर त्रस्त झाले आहेत कोणत्याही परिस्थितीत पाणी मिळाल्याशिवाय शांत बसायचे नाही असा निर्धार केला असल्याचे रामेश्‍वर आंग्रे यांनी सांगितले.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment