News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

स्वर्गीय गोविंदराव शिंदे स्मृती सन्मानाचे प्रथम मानकरी मनजीत सिंह शीख .... पनवेलच्या शांतीवनात पुरस्काराने कार्यकर्त्याचा सन्मान

स्वर्गीय गोविंदराव शिंदे स्मृती सन्मानाचे प्रथम मानकरी मनजीत सिंह शीख .... पनवेलच्या शांतीवनात पुरस्काराने कार्यकर्त्याचा सन्मान

पनवेल- कुष्ठरोग निवारण समिती शांतीवनचे शिल्पकार,भूतपूर्व कार्यवाह,विश्वस्त कै.गोविंदराव शिंदे तसेच भूतपूर्व कार्याध्यक्ष कै.प्रकाशभाई मोहाडीकर यांचे स्मृतिदिन आत्ताच शांतीवन येथे झाले.यानिमित्ताने ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते श्री.शंकर बगाडे यांच्या कुटुंबीयांच्यावतीने गोविंदराव शिंदे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ यावर्षीपासून दरवर्षी गोविंदराव शिंदे यांच्या विचारानुसार कार्य करणाऱ्या एका कार्यकर्त्याचा सन्मान करायचे ठरवले. रुपये ११,०००/-, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल,श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.या पुरस्काराचे प्रथम मानकरी श्रीमनजीत सिंग शीख यांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. 

मनजीत सिंग शीख हे बुलढाणा जवळ सलाईबन नावाचा प्रकल्प चालवतात.एका उजाड माळरानावर नंदनवन फुलवण्याचं काम त्यांनी केले आहे. ७२ एकर भकास व ओसाड पडलेल्या जमिनीवर 'आनंदवन', 'शांतीवन' 'हेमलकसा' या संस्थांच्या मार्गदर्शनातून तसेच बाबा आमटे,प्रकाश आमटे, गोविंदराव शिंदे,शंकर बगाडे यांच्या सहकार्याने आपण हे काम करू शकलो असे श्री.शिख आपल्या मनोगतात म्हणाले. 

जल, जंगल, जमीन, जनावरे आणि जन या पाच 'ज' ची सुरक्षा करणे आता आपल्या सर्वांच्या हाती आहे. सामाजिक कार्यात दिवसेंदिवस दोन गोष्टीची वानवा दिसते. एक म्हणजे संघटनात्मक काम करणाऱ्या संस्थांची उणीव व दुसरी महत्त्वाची सामाजिक कार्यात तरुणांचा सहभाग कमी होत चालला आहे. जर हेच चित्र असेच राहिले तर तरुणांच्या हाती दगड आणि तलवारी येतील आणि मग समाजाची परिस्थिती काय होईल हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. या पुरस्काराने माझी जबाबदारी वाढलेली आहे, याची जाणीव मला आहे. या पुरस्काराला न्याय देण्याचं कार्य यापुढेही मी सातत्याने करत राहीन असे यावेळी ते म्हणाले. 
या कार्यक्रमाच्या वेळी सर्वस्वी उदय ठकार,अल्लाउद्दीन शेख, सुभाष भोपी,साईनाथ भोपी, संतोष ढोरे,फाल्गुनी मेहता,वामन पाटील आदींनी गोविंदराव शिंदे व प्रकाश भाई मोहाडीकर यांच्या बद्दलच्या आठवणी सांगितल्या. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. प्रमोद ठाकूर यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती रक्षा मेहता यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.यशवंत बिडये यांनी केले.या कार्यक्रमाला सर्व शांतीवनवासिय,तसेच गोविंदराव शिंदे व प्रकाशभाई मोहाडीकर यांच्या विचाराचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment