पनवेल महापालिकेचे तत्कालीन आयुक्त सुधाकर देशमुख यांना मातृशोक
पनवेल (प्रतिनिधी) - पनवेल महापालिकेचे तत्कालीन आयुक्त् सुधाकर देशमुख यांच्या मातोश्री हिराबाई देशमुख यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले.त्यांना समाजातील विविध स्तरातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे.
कै.हिराबाई विष्णु देशमुख या १९५६ मध्ये जावळेकडलग या गावातील पहिल्या सातवी शिकलेल्या महिला ठरल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात शिक्षणाला अतिशय महत्व दिले जात होते.कै.हिराबाई आयुष्य हे केवळ मायेचं नव्हते,तर कष्टाचं, धैर्याचं आणि प्रेरणादायी कार्याचे होते.त्या शेतकरी कुटुंबातून होत्या.त्यांनी अनेक वर्षं शेती केली,बैलगाडी चालवली व स्वतः नांगर हाकला,रात्रंदिवस कष्ट केले.त्यांच्या श्रमांतून आणि शेताच्या उत्पन्नातून त्यांनी आपल्या तिन्ही मुलांना विज्ञान शाखेत शिक्षण दिलं.त्या काळात नळवाडी गावातील विज्ञान शाखेतील पहिली पदवीधर मुलं त्यांचीच होती.हे केवळ अभिमानास्पदच नव्हे,तर इतिहासात कोरून ठेवावं असं कार्य होते.याशिवाय,नळवाडी गावात कोणत्याही लहान मुलाला जरी काही आजार झाला,तरी आजीकडे त्यावर उपाय असायचे, जसे की सरी (मानदुखी) बरी करण्याचे उपाय,पोटदुखीवरील घरगुती उपचार, हाडं व स्रायूंवरील फिजिओथेरपीसारख्या पद्धती.त्यांचं ज्ञान आणि अनुभव गावासाठी एक जिवंत वैद्यकीय शाळाच होती.सुधाकर देशमुख यांच्या वर त्यांच्या आईचे विशेष प्रेम होते.शेवटच्या क्षणापर्यंत त्या त्यांना साथ देत राहिल्या, आशीर्वाद देत राहिल्या.त्या आपली माया, आपुलकी,आणि आशीर्वाद घेऊन गेल्या,पण त्यांच्या आठवणी,त्यांच्या आठवणींची उब,आणि त्यांनी दिलेला प्रेमाचा वारसा कायमच त्यांच्या कुटुंबासोबत राहिला आहे.कै.हिराबाई विष्णु देशमुख यांचा दशविधी सोमवार दि.२१ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता गंगाश्रम नळवाडी ता.सिन्नर जिल्हा नाशिक येथे करण्यात येणार असल्याचे त्यांच्या कुटुंबा कडून सांगण्यात आले आहे.
Post a Comment