पुरस्कार कार्याला बळ देतात - आ. प्रशांत ठाकूर ....गणेश कोळी संपादित पनवेल टाइम्सचा पनवेल टाइम्स सन्मान पुरस्कार सोहळा संपन्न ...
पनवेल- पनवेल महानगर आणि परिसरात काम करणारी अनेक व्यक्तिमत्वे,संस्था आहेत त्यांचा झालेला गौरव,त्यांना मिळालेला पुरस्कार हा त्यांना आणखी काम करण्यास बळ देतो,असे प्रतिपादन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी गणेश कोळी संपादित पनवेल टाइम्सच्या वर्धापन दिनानिमित्त पनवेल टाइम्स सन्मान पुरस्कार सोहळ्याप्रसंगी पनवेल येथे केले.या पुरस्कार सोहळ्यास खगोल अभ्यासक,पंचांगकर्ते दा.कृ.सोमण,कामगार नेते,रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत,जेष्ठ साहित्यिक रायगड भूषण प्रा. एल.बी.पाटील,सुप्रसिध्द अभिनेत्री मुग्धा गोडबोले,माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला,शिवसेनेचे नेते रमेश गुडेकर, पनवेल टाइम्सचे संपादक गणेश कोळी उपस्थित होते.या समारंभात पनवेलचे नाव उंचवणाऱ्या व्यक्ती आणि सेवाव्रती संस्थांना पनवेल टाइम्स सन्मान पुरस्काराने मान्यवरांचे हस्ते गौरविण्यात आले.वर्धापन दिनानिमित्त पनवेल टाइम्सच्या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.त्याचप्रमाणे वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या माझ्या स्वप्नातील पनवेल.. या निबंध स्पर्धेच्या विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.
यापुढे बोलताना आ.प्रशांत ठाकूर म्हणाले,पनवेल हा वेगाने विकसित होणारा तालुका आहे आंतराष्ट्रीय विमानतळ,या भागात येणारे मोठं मोठे प्रकल्प यामुळे पनवेलचे चित्र प्रत्येक वर्षागणीत बदलत चाललेले आहे.व्यक्ती आणि संस्थांना मिळालेल्या पुरस्कारांमुळे पनवेलचा असाच गौरव वाढत राहो,समाजाने या पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती आणि संस्थांचा आदर्श घ्यावा असे सांगून पनवेल टाइम्सने कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वास आणि संस्थांना दिलेल्या पनवेल टाइम्स सन्मान पुरस्कार या उपक्रमाचे कौतुक केले.
यापुढे बोलताना कामगार नेते,रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी,समाजात चांगलं काम करणाऱ्यांचा गौरव झालाच पाहिजे.आज आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात जी समाजसेवा करतो ती समाजसेवा ती समाजसेवा निस्वार्थ भावनेतून करतो.कुठला पुरस्कार मिळावा म्हणून काम करत नसून खऱ्या अर्थाने समाजासाठी काम करत असल्याचे सांगितले खगोलअभ्यासक,पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांनी आपल्या भाषणात,आज आपली जगाशी स्पर्धा आहे,पण भारत देश कुठल्याही क्षेत्रात कमी नाही.जगामध्ये बुद्धिमत्तेमध्ये भारताचे वर्चस्व आहे.शेती क्षेत्रात भारताने कमालीची वैज्ञानिक प्रगती केली आहे.पनवेल टाइम्सने चांगले कार्य करणाऱ्यांना पनवेल टाइम्स सन्मान पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याची शाब्बासकी दिली आहे, पुरस्कार मिळाल्याने त्या संस्थांची जबाबदारी तेवढीच मोठी वाढणार आहे,असे त्यांनी सांगितले.
सुप्रसिद्ध अभिनेत्री मुग्धा गोडबोले यांनी,समाजामध्ये खूप गोष्टी करण्यासारख्या आहेत.वाढदिवस,वर्धापन दिन अनेक पद्धतीने साजरे केले जातात अशा कार्यक्रमातून पैशाची उधळपट्टी केली जाते पण पनवेल टाइम्सचे संपादक गणेश कोळी यांनी समाजामध्ये काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना पुरस्कार देऊन समाजाचे कौतुक केले आहे.या व्यक्ती संस्थांनी अनेक वर्षाच्या केलेल्या कामांचा हा आजचा सत्कार आहे. त्या खऱ्या अर्थाने पनवेलचे नाव उंचावत आहेत,पनवेलला पुढे नेत आहेत जगात लोक कोणत्या प्रकारचे काम करतात हे या समारंभातून कळतंय अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.यावेळी जेष्ठ साहित्यिक, रायगडभूषण प्रा.एल.बी पाटील यांचे भाषण झाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक पनवेल टाइम्सचे संपादक गणेश कोळी यांनी केले.उपस्थितांचे आभार ऍड.मनोज म्हात्रे यांनी मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंजना केणी यांनी केले.
Post a Comment