News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेल आगाराचे काम सुरू न केल्यास ठेकेदारावर कारवाई करण्याचे आदेश ....पनवेल आगाराचे काम अनेक वर्षे रखडल्याने आ.प्रशांत ठाकूर यांच्या मागणीवरून पालकमंत्री,एसटी अधिकारी,ठेकेदार आणि महापालिका आयुक्त यांची संयुक्त बैठक

पनवेल आगाराचे काम सुरू न केल्यास ठेकेदारावर कारवाई करण्याचे आदेश ....पनवेल आगाराचे काम अनेक वर्षे रखडल्याने आ.प्रशांत ठाकूर यांच्या मागणीवरून पालकमंत्री,एसटी अधिकारी,ठेकेदार आणि महापालिका आयुक्त यांची संयुक्त बैठक

पनवेल -  पनवेल एसटी आगाराचे काम करणार्‍या ठेकेदारांला उद्याच्या उद्या पत्र द्यावे त्याने काम सुरू न केल्यास त्याची ठेकेदारी रद्द करण्याची कारवाई आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.पनवेल आगाराचे काम अनेक वर्षे रखडल्याने त्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीवरून पालकमंत्र्यांनी एसटी अधिकारी ठेकेदार आणि महापालिका आयुक्त यांची संयुक्त बैठक बोलावली होती. 

यावेळी प्रशांत ठाकूर यांनी, पनवेल आगाराचे 2018 मध्ये ठेकेदाराने काम पूर्ण करायचे होते.कामाची मुदत पूर्ण होऊनही ठेकेदाराचे काम सुरू केले नाही.त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.या बांधकामासाठी आवश्यक त्या परवानगी आणणे ही जबाबदारी ठेकेदाराची आहे.मग एसटी प्रशासन त्याला का पाठीशी घालत आहे? असा प्रश्न विचारला.बीओटी तत्त्वावर उभारण्यात येणार्‍या या आगाराच्या जागेमध्ये सीएनजी गॅसचा पंपही उभारण्यात येणार असल्याची माहिती एसटीच्या अधिकार्‍यांनी दिली.त्यासाठी आवश्यक परवानगी घेतली असल्याचे सांगितले.महापालिका आयुक्तांनी त्याच्या दोन परवानग्या बाकी असून पर्यावरण विभागाची परवानगी मिळाली नाही,हे लक्षात आणून दिले. त्यांनी सीएनजी पंपाचे काम बाजूला ठेवून इतर कामाला सुरुवात करण्यास परवानगी देण्याची तयारी दर्शवली.


पालकमंत्री उदय सामंत यांनी,आम्ही रत्नागिरी स्टॅन्डचे काम करताना 600 कोटी रुपये राज्यातील इतर ठिकाणच्या आगाराच्या कामासाठी मंजूर करून घेतले होते.त्यामधून पनवेलचे काम का केले नाही? असा प्रश्न एसटीच्या अधिकार्‍यांना विचारला.यावेळी आमदार महेश बालदी यांनी सहा वर्षे यांना परवानगी मिळत नसेल तर अजून 16 वर्षे हे काम रखडेल,अशी शंका व्यक्त केली.पालकमंत्री उदय सामंत यांनी एसटीच्या अधिकार्‍यांना ठेकेदाराला पत्र देऊन त्याचे कामाचे नियोजन काय आहे हे विचारावे.या आगाराच्या हद्दीत जे जुने व्यावसायिक आहेत त्यांचीही सोय त्याने करणे गरजेचे आहे.ठेकेदाराने पत्र दिल्यानंतर काम सुरू न केल्यास त्याच्यावर पुढील कारवाई करावी,असे आदेश दिले.आमदार प्रशांत ठाकूर यांनी,एक महिन्याने पुन्हा बैठक घेण्याची मागणी केली.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment