कर्जत तालुक्यातील अनेक मतदान केंद्राना वादळी वारा, पावसाचा फटका... मावळ लोकसभा महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांची फेर मतदानाची मागणी
पनवेल- मावळ लोकसभा मतदारसंघातील कर्जत तालुक्यातील अनेक ग्रामीण भागामध्ये आज वादळी वारा व पाऊस झाल्यामुळे या भागातील लाईटचे पोल पडले व घरावरील पत्रे उडून गेले,यामुळे अनेक ठिकाणातील मतदान केंद्रावर लाईट नसल्याकारणाने दोन ते तीन तास अनेक मतदार मतदान करू शकले नाहीत,त्यामुळे कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील परिस्थितीची चौकशी करून त्या भागात फेर मतदान घेण्यात यावे अशी मागणी मावळ लोकसभा महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त यांच्याकडे केली आहे.
Post a Comment