पनवेलच्या वडाळे तलावाच्या प्रदक्षिणा मार्गातील झाडांना पाणी घालणारा ८२ वर्षाचा अवलिया ...मुकुंद गोंधळेकर यांचा नित्य नियमाचा उपक्रम
पनवेल- अगदी पाणी उशाशी.... पण झाडांना पाणी घातल जात नाही .... हिरवाई वाढली पाहिजे.... त्यासाठी झाडेही जगली पाहिजेत .... ही कुणाची तरी जबाबदारी आहे,या आपल्या कर्तव्य भावनेतून हिरवळीवर प्रेम असणारे पनवेलमधील ८२ वर्षाचे तरुण श्री मुकुंद गोंधळेकर हे पनवेलच्या वडाळे तलावाच्या प्रदक्षिणामार्गातील झाडांना दररोज न चुकता पाणी घालत आहेत.
वडाळे तलाव हा मोठा तलावाचा परिसर आहे.या तलावा सभोवताली पनवेल महानगरपालिकेने सुशोभीकरण केले आहे.अनेक प्रकारची झाडे लावली,ती झाडे मोठी होत आहेत.या तलावाच्या प्रदक्षिणा मार्गावर आवश्यकतेपेक्षा महापालिकेने दगडी बांधकाम केले आहे.ऊन आणि कडक उन्हात दगडी बांधकाम खूप तापते,त्याचा परिणाम येथील झाडांवर होतो.उष्णघातामुळे अनेक माणसं दगावले असल्याची उदाहरणे आहेत तर झाडांचं काय? झाडांना जर पाणी मिळालं नाही तर झाड सुकून जातात.पाणी अगदी उशाशी पण झाडांना पाणी मिळत नाही,हे मुकुंद गोंधळेकर यांच्या लक्षात आल, त्यांनी पाऊस संपल्यापासून या प्रदर्शना मार्गावरील झाडांना पाणी घालणं सुरू केले.छोट्या-मोठ्या कॅनद्वारे तलावातील पाणी घेऊन ते झाडांना पाणी घालतात.त्यांचं हे काम पाहून त्यांना या कामी मॉर्निंग वॉक करणारे महिला-पुरुष आणि वडाळे तलाव योगा ग्रुप त्यांना मदत करते,त्यांची मोठ्या पद्धतीने त्यांना मदत होते.हे त्यांचे काम नित्य नियमाने चालू आहे.प्रदक्षिणा मार्गावर लावलेल्या झाडांच्या सभोवताली जी रिकामी जागा आहे त्या रिकाम्या जागेत वेली लावल्या आणि त्या भिंतीवर सोडल्या तर अजून हिरवाळी निर्माण होऊ शकेल असे मुकुंद गोंधळेकर यांचे मत आहे.
ही सार्वजनिक मालमत्ता आहे,लोकांची मालमत्ता आहे पण त्याकडे कोणी पाहत नाही.झाडांना पाणी देणे हे शासकीय यंत्रणेचे हे काम आहे पण ते करत नाहीत पण आपली ही जबाबदारी आहे म्हणून कर्तव्यापोटी मुकुंद गोंधळेकर हे काम चोखपणे करत आहेत.येथील झाडांना पाणी देताना मी लोकांमध्ये झाडांविषयी जनजागृती ही करत आहे त्या लोकांचा सहभाग मिळत आहे.झाडे लावली,ती जगवली तरच आपल जीवन सुखी होणार आहे असे शेवटी मुकुंद गोंधळेकर यांनी बोलताना सांगितले.
Post a Comment