जागतिक शांततेसाठी सलग ३ दिवस श्री शतचंडी महायज्ञ ... पनवेलच्या श्री साईबाबा मंदिरात आयोजन
पनवेल (संजय कदम): जागतिक शांततेसाठी सलग ३ दिवस श्री शतचंडी महायज्ञाचे आयोजन पनवेल येथील प. पू. सद्गुरु श्री साई नारायण बाबांच्या आशीर्वाद श्री साईबाबा मंदिर,पनवेल येथे करण्यात आले आहे.रविवार दिनांक १४ एप्रिल ते १६ एप्रिल असे सलग तीन दिवस या श्री शतचंडी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर महायज्ञाला सकाळी ७.३० तर तरी ८.०० वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.या महायज्ञामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक सहभाग घेणार असल्याने अत्यंत नियोजन पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती चेअरमन खेमचंद गोपलानी, कोऑडिटर राम थदानी व सचिव रामलाल चौधरी यांनी दिली आहे.यासाठी आकाश चौहान व कुटुंबियांचे मोठे सहकार्य लाभणार आल्याची माहिती सुद्धा देण्यात आली आहे.
Post a Comment