शिकवणीस जातो सांगून घराबाहेर पडलेले दोघे अल्पवयीन भाऊ बेपत्ता ; उलवे परिसरात खळबळ ....ऐन परीक्षेच्या काळात पालकवर्गात चिंतेचे वातावरण
पनवेल (वार्ताहर) : शिकवणीस जातो सांगून घराबाहेर पडलेले उलवे येथील सेक्टर २४ येथून एकाच कुटुंबातील दोघे अल्पवयीन भाऊ बेपत्ता आहेत. याप्रकरणी त्यांचे वडील अनिल यादव यांनी दिलेल्या तक्रारीवरून एनआरआय पोलिस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
एकाच कुटुंबातील दोन अल्पवयीन भाऊ अशाप्रकारचे बेपत्ता झाल्याने ऐन परीक्षेच्या काळात पालकवर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यांची शोधाशोध केली,परंतु सापडले नाहीत.अनिल यादव यांचा टेलरिंगचा व्यवसाय आहे.पत्नी सुधादेवी यादव ही गेल्या महिन्यात गावी गेल्याने आपल्या मुलगी आणि दोन मुलांचा सांभाळ तेच करीत आहेत.दोन्ही मुले शाळेतून घरी आल्यानंतर सायंकाळी जवळच असलेल्या वहाळगावात खासगी शिकवणीला गेले.शिकवणी घेणाऱ्या दीपा यांनी यादव यांना फोन करून त्यांची दोन्ही मुले शिकवणीला का आली नाहीत, अशी विचारणा केली.दोन्ही मुले घरीही न परतल्याने यादव यांनी शोधाशोध केली.थांगपत्ता न लागल्याने त्यांनी अखेर एनआरआय पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार केली. या दोन्ही मुलांना कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करून त्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे भारतीय दंडसंहिता १८६० अंतर्गत कलम ३६३ अन्वये अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Post a Comment