News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

सैनिक हो तुमच्यासाठी ....भारत विकास परिषद,पनवेल शाखेतर्फे सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी १० हजार फराळाचे बॉक्स पाठवणार

सैनिक हो तुमच्यासाठी ....भारत विकास परिषद,पनवेल शाखेतर्फे सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी १० हजार फराळाचे बॉक्स पाठवणार

पनवेल (संजय कदम): ‘सैनिक हो तुमच्‍यासाठी' हा भारत विकास परिषद, पनवेल शाखेचा प्रमुख प्रकल्प आहे, जो गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे आणि या उपक्रमामधे उत्तरोत्तर प्रगती होत आहे. या उपक्रमाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी भेट देत नितिन कानेटकर, डॉ. किर्ती समुद्र, सौ. ज्योती कानेटकर, सुबोध भिडे यांच्याकडून सविस्तर माहिती घेत कौतुक केले. यंदाच्या वर्षी सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी १० हजार फराळाचे बॉक्स पाठवणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
भारत विकास परिषद ही एक राष्ट्रीय स्वयंसेवी संस्था आहे जी 1963 पासून स्वस्थ, समर्थ आणि संस्कृत भारत निर्माण करण्यासाठी कार्यरत आहे. भारत विकास परिषदच्या देशभरात 1,500 पेक्षा जास्त शाखा आणि 1,50,000 पेक्षा जास्त सदस्य आहेत. भारत विकास परिषदेची सर्व माहिती www.bvpindia.com वर उपलब्ध आहे. पनवेल शाखेची स्थापना 2019 साली झाली आणि 2020 मध्ये दिवाळीच्या निमित्ताने, भारत विकास परिषद ने या नवीन प्रकल्पाची सुरुवात केली व संकल्पनेला आपले ध्येय बनवले. सीमेवरील आपल्या सैनिकांना काही मिठाई (लाँग शेल्फ-लाइफ पौष्टिक लाडू) पाठवण्याचा निर्णय घेतला. 

कोव्हिडचा काळ असल्याने, सर्व खबरदारी घेत, त्यांनी जवानांना आमच्या सदस्यांनी लिहिलेल्या कवितांसह, हाताने बनवलेले 14,000 पौष्टिक लाडू या कठीण काळातही पाठवण्यात ते यशस्वी झाले. ज्यांच्या कष्टामुळे आपण घरी शांतपणे झोपू शकतो त्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या या उपक्रमाचे लष्करानेच नव्हे तर पनवेलच्या प्रतिष्ठित नागरिकांनीही कौतुक केले आणि त्यामुळे भारत विकास परिषदने हा प्रकल्प वाढत्या उत्साहाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अशा वाढत्या पाठिंब्यामुळे भारत विकास परिषदने मातृभूमीच्या विविध सीमांचे रक्षण करणार्‍या सैनिकांना 10 हजार फराळाचे बॉक्स सीमेवर पाठवण्याचे लक्ष्य भारत विकास परिषद पनवेल ठेवले आहे.यासाठी ६०० किलो चिवडा, ६०० किलो शेव, ४५० किलो चकली आणि १० हजार लाडू आले आहेत.

येत्या दोन दिवसांत हे सर्व पदार्थ बॉक्समध्ये भरून सोमवार ते गुरुवार पर्यंत रेल्वे पार्सल तसेच एयर कार्गो मार्फत भारतीय लष्कराच्या आर्मी कॅम्पवर पोहचवण्यात येतील त्यानंतर आर्मी ऑफिसर्स पदार्थांची चाचणी करून प्रत्यक्ष हायर कॅम्प बॉर्डरवरच्या जवानांना ही पार्सल पाठवतील. या सर्व प्रक्रियेसाठी अंदाजे 10  ते 15 दिवस लागतात. यासाठी उदात्त भावनेने पाठविलेली देणगी भारत विकास परिषदेच्या प्रांताच्या अकाऊंटमध्ये जमा होते आणि प्रांत कार्यालयातर्फे सर्व वेंडर्सना त्वरित पैसे अदा केले जातात या द्वारे पारदर्शकता सुद्धा जपण्यात येते.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment