वर्षा बंगल्यावर तातडीची बैठक; मंत्री नवाब मलिक राजीनामा देणार का?
मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीनं अटक केल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि शरद पवार यांच्यामध्ये तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे.
संध्याकाळी पाच वाजता ही बैठक पार पडणार आहे. मलिकांवरील अटकेच्या कारवाईमुळं सरकारच्या अडचणीत वाढ झाल्यानं या बैठकीत नवाब मलिकांवर राजीनामा देण्यासाठी दबाव वाढण्याची शक्यता आहे.
Post a Comment