अविनाश कोळी यांची भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी पुनर्निवड
भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील विविध जिल्हाध्यक्षांच्या निवड प्रक्रिया नुकतीच पार पाडली आहे.पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीसाठी व स्थानिक पातळीवर प्रभावी नेतृत्व निर्माण करण्याच्यादृष्टीने या निवडी करण्यात आल्या आहेतया प्रक्रियेत पारदर्शकता व कार्यक्षमता राखण्यासाठी पक्षाने ठोस निकष निश्चित केले,
त्यामध्ये जिल्हाध्यक्ष पदासाठी ६० वर्षांखालील उमेदवारांनाच प्राधान्य देण्यात आले आहे.अविनाश कोळी यांचे संघटनात्मक कार्यासाठी नियोजन उत्तम प्रकारचे असते. पक्षाचे ध्येय धोरण आणि उपक्रमे नेहमीच यशस्वी करत त्यांनी यापूर्वीही जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी चोख पार पाडली आहे तसेच निवडणुकाही जिंकण्यात त्यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून उत्कृष्ट काम केले आहे.त्याचबरोबरीने संघटनात्मक जबाबदारीने काम केले आहे.त्यामुळे त्यांची महाराष्ट्र प्रदेश भाजपने पुनर्निवड जाहीर केली आहे.
Post a Comment