News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

आला उन्हाळा,आरोग्य सांभाळा ... नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांचे आवाहन

आला उन्हाळा,आरोग्य सांभाळा ... नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांचे आवाहन

पनवेल - : उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस अधिक वाढू लागली आहे.त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन महापालिकेच्यावतीने आयुक्त श्री.मंगेश चितळे यांनी केले आहे.

 गेल्या काही दिवसापासून उन्हाची तीव्रता वाढू लागली असल्याने नागरिकांनी  खबरदारी घेणे गरजेचे आहे. येथून पुढील काळात उन्हाळ्याची तीव्रता अधिक वाढणार आहे, त्यामुळे महत्वाच्या कामाशिवाय भर दुपारी उन्हात जाणे नागरिकांनी शक्यतो टाळावे.

 उन्हाच्या तडाख्यात बाहेरील कोल्ड्रिंक न घेता घरी बनवलेले ताक, दही, लिंबूपाणी, कैरीचे पन्हे, उसाचा रस, पुदिना सरबत नियमित घ्यावीत व भरपूर प्रमाणात पाणी प्यावे. उन्हाळ्यात सहज मिळणारी व पाण्याचे प्रमाण जास्त असणाऱ्या रसदार फळांचे सेवन करावे.उन्हामुळे तापमान वाढून शरीरातील पाण्याचे प्रमाण वारंवार कमी होत असते. दुपारी 12 ते 3  उन्हात जाणे शक्यतो टाळावे.

रसदार फळांचे सेवन करावे. उन्हामुळे तापमान वाढून शरीरातील पाण्याचे प्रमाण वारंवार कमी होत असते. दुपारी उन्हात शेतीत कष्टाची कामे टाळावीत.

चौकट
*काय घेऊ नये*
.जंक फूडमध्ये फॅट्सचे प्रमाण जास्त, पचायला कठीण यामुळे वजन वाढते,
• मांसाहार: पचनास जड असल्याने मांसाहार टाळावा.
 • मसाल्याचे पदार्थ: उष्ण असल्याने मसाले अतिप्रमाणात वापरणे टाळावेत.
• कोल्ड्रिंक्स: शरीराला अपायकारक असल्याने सेवन कमी प्रमाणात करावे. तसेच चहा-कॉफीचेही प्रमाण कमी करावे.


हे आहे फायदेशीर .... 
• कडुनिंबाची पाने किंवा लिंबाचा रस अंघोळीच्या पाण्यात टाकल्याने त्वचारोगापासून रक्षण होते.
• पुदिना चटणी, कैरीची चटणी, कढीपत्ता चटणी, कोशिंबीर, लोणचे, असे तोंडी लावायचे पदार्थ जेवणात वापरावे.
■ दैनंदिन आहारात कांदा, कैरी, टोमॅटो, काकडी आदींचासमावेश करावा. 
■ फिकट व पांढऱ्या रंगाचे सैल कपडे वापरावेत.


हे आहेत थंड पदार्थ ....
कलिंगड, सफरचंद, चिकू, लिंबू, कांदा, पालक, टोमॅटो, गोबी, गाजर, मुळा, कोथिंबीर, पुदिना, भेंडी, बीट, डाळिंब, उसाचा रस, नारळ पाणी, मीठ, मूग डाळ, शेवगा,

चौकट
काय घ्यावे
• पिण्याचे पाणीः दररोज कमीत कमी १२ ते १५ ग्लास पाणी प्यावे.
• लिंबू पाणी : हे शरीरातील पाण्याची पातळी समांतर ठेवून नको असलेले घटक शरीराबाहेर टाकते.
 • ताक पोटातील आग आणि पित्त दूर होण्यास मदत होते.
• कैरीचे पन्हे : थकवा जाणवत नाही. यामुळे आहारात याचा समावेश करावा.
. नारळपाणी :  उष्णता कमी होते, पोटातील आम्लाची पातळी कमी करण्यास मदत होते. दररोज प्यावे.

उन्हात उपाशीपोटी घराबाहेर पडल्यास चक्कर तसेच सनस्ट्रोक होण्याची भिती असते.त्यामुळे नागरिकांनी उपाशीपोटी घराबाहेर पडू नये. तसेच सतत पाणी पिणे आवश्यक आहे.त्यासाठी पाण्याची बाटली सोबत ठेवा. शक्यतो पूर्ण बाही असलेले सुती कपडे घातल्यास घामाचा परिणाम होत नाही.त्वचेला उष्णतेपासून वाचवण्यासाठी सनस्क्रीन, उन्हामध्ये चांगल्या दर्जाचा गॉगल वापरावा, टोपीचा देखील वापर करावा. दुपारी १२ ते ३ वाजेच्या दरम्यान उन्हाचा पारा जास्त असतो.त्यामुळे या काळामध्ये घराच्या बाहेर पडणे टाळावे. 
- डॉ.आनंद गोसावी 
मुख्य वैद्यकीय अधिकारी, 
पनवेल महानगरपालिका

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment