News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

मुंबई-वर्सोवा ते पंढरपूर पायी वारीचे पनवेलमध्ये स्वागत ....टपाल नाका शनी मंदिरात श्री गणेश मित्र मंडळ मंडळातर्फे वारकऱ्यांना महाप्रसादाचे आयोजन

मुंबई-वर्सोवा ते पंढरपूर पायी वारीचे पनवेलमध्ये स्वागत ....टपाल नाका शनी मंदिरात श्री गणेश मित्र मंडळ मंडळातर्फे वारकऱ्यांना महाप्रसादाचे आयोजन

पनवेल - वारी ही महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा आहे.वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे.आळंदी येथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ झाल्या आहेत. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून पंढरपूरला वाऱ्या जात आहेत,अशाच पद्धतीने
मुंबईहून पंढरपूरला निघालेल्या मुंबईच्या वर्सोवातील हरी विजय वारकरी मंडळ वारीचे पनवेलमध्ये स्वागत करण्यात आले.टपाल नाका येथील शनी मंदिरात श्री गणेश मित्र मंडळ मंडळाचे अध्यक्ष सुनील खळदे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह वारी आणि वारकऱ्यांचे स्वागत केले व वारकऱ्यांना महाप्रसादाचे आयोजन केले.
वारीचे हे 23 वे वर्ष आहे. वारीमध्ये 40 वारकऱ्यांचा समावेश आहे.वर्सोवा गावातील आपले आजोबा,आपले बाबा त्याचप्रमाणे भजनी मंडळी ही गेली अनेक वर्षे पंढरपूर वारी करत आहेत,तीच परंपरा आम्ही पुढे चालू ठेवली असल्याचे हरिविजय वारकरी मंडळाचे अध्यक्ष नितीन द्वारकानाथ भाटे यांनी सांगितले.या वारीत हरिविजय वारकरी मंडळाचे सेक्रेटरी मंगेश चंद्रकांत चिखले, खजिनदार व वारीचे बुवा श्री प्रल्हाद द्वारकानाथ पिकले यांच्यासह अनेक वारकरी सहभागी झाले आहेत.पनवेल येथे झालेले स्वागत व महाप्रसादाने वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment