भाजपाचे बुथ विजय अभियान ...मावळ,रायगडमध्ये भाजपाचे उमेदवार नसले तरी महायुतीचे उमेदवार ताकतीने निवडून आणणार-भाजपा प्रवक्ते अवधूत वाघ
पनवेल- मित्र पक्षांसहित देशात ४०० हून अधिक जागा भाजपा निवडून आणणार तसेच मावळ,रायगडमध्ये भाजपाचे उमेदवार नसले तरी महायुतीचे उमेदवार ताकतीने निवडून आणणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी पनवेल येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
६ एप्रिल रोजी भाजपा आपला ४४ वा वर्धापन दिन साजरा करत आहे,त्यानिमित्ताने बुथ विजय अभियान या नवीन योजनेचा शुभारंभ आजपासून सगळीकडे केला आहे,या योजनेची माहिती प्रवक्ते अवधूत वाघ यांनी पत्रकार परिषद दिली.या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र भाजपाचे प्रवक्ते वसंतराव जाधव,पंकज मोदी,रायगड जिल्हा भाजपाचे सरचिटणीस माजी नगरसेवक नितीन पाटील तसेच प्रकाश बिनेदार उपस्थित होते.
यावेळी माहिती देताना अवधूत वाघ म्हणाले,जगातील सर्वात मोठा पक्ष भाजपा आहे.बुथ विजय अभियानांतर्गत प्रत्येक बुथवर भाजपा कार्यकर्ता जाऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून केंद्र व राज्य सरकारने केलेली कामे विविध,विकास योजना,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा,आंतरराष्ट्रीय ख्याती या माहिती सोबतच प्रत्येक घरोघरी, विविध योजनांच्या लाभार्थींना भेटून घेतलेल्या सरकारी योजनांचा लाभ घेतल्याबद्दल आभार मानले जाणार आहेत. महायुतीच्या उमेदवाराला ५१ टक्के मते पडली पाहिजेत यासाठी बुथवर कार्यकर्ते मेहनत घेणार आहेत,अशी शेवटी प्रवक्ते अवधूत वाघ यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
Post a Comment