पनवेल तालुक्यातील धामणी येथील आदिवासी कुटुंबांना तहसीलदार विजय पाटील यांच्या आदेशाने मिळाली हक्काची जमीन ...
पनवेल- पनवेल तालुक्यातील धामणी येथील आदिवासी कुटुंबांना तहसीलदार विजय पाटील यांच्या आदेशाने मिळाली हक्काची जमीन मिळाली आहे.
मौजे धामणी येथील सर्व्हे नंबर क्षेत्र 5 एकर आणि सर्व्हे नंबर क्षेत्र 10 एकर जमीन मिळकत ही भस्मा आणि खंडवी ह्या आदिवासी कुटुंबांच्या नावे सातबारा सदरी होती.काहींनी आदिवासी कुटुंबाची फसवणूक करून त्यावर कब्जा केला होता.उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून महसूल कार्यालयात,पोलीस स्टेशनमध्ये अर्ज दाखल करण्यात आले.त्याचा सतत पाठ पुरावा केल्याने पनवेलचे तहसीलदार विजय पाटील यांनी सदरहू जागेचा घेतलेला ताबा कब्जा सोडण्याचे आदेश त्यांना दिले.प्रथम,खाली करण्यासाठी एक महिन्यांची मुदत मागितली. परंतु उशिरा का होईना पण जागा खाली केली आहे.तरिही काही जागे वरील बांधकाम तोडलेले नाही. त्या संदर्भात तक्रार दाखल करण्यात येणार आहे.ही जमीन उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून परत मिळाल्याने सर्व आदिवासी कुटुंब खुश होते.
आदिवासी कुटुंबांनी उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर उपाध्यक्ष प्रा. राजेंद्र मढवी,सरचिटणीस संतोष पवार आणि सर्व पदाधिकारी यांचे मनापासून अभिनंदन आणि आभार मानले आहेत.
या कामी कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर,जिल्हाधिकारी जावळे,अपर जिल्हाधिकारी थोरवे साहेब, उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती शशिकला अहिरराव यांचे विशेष सहकार्य मिळाले.
Post a Comment